TransLiteral
व्यक्ति मृत झाल्यावर त्याचा आत्मा पृथ्वीवर १० दिवस भटकत असतो, आणि त्यानंतर त्याला स्वर्गात प्रवेश मिळतो असा हिंदू धर्मियांचा विश्वास आहे.
पृथ्वीवरील एक महिना म्हणजे पितरांवा एक दिवस होतो, त्याप्रमाणे दहा दिवस म्हणजे पृथ्वीवरील दहा महिने. हे दहा दिवस आत्मा आपल्या कुटुंबियां सोबतच असतो. मग अशा परिस्थितीत ती व्यक्ति आपल्यात नसतांना आणि आत्मा रूपाने घरात असतांना आपण सणवार साजरे करणे बरे वाटत नाही म्हणून एक वर्षभर आनंदाचे कार्यक्रम करू नयेत.