TransLiteral
असे म्हणतात की, अशुभ कार्याला जाऊन आल्यावर पाय सर्व बाजूंनी धुवून घरात यावे, कारण अशुभ शक्ती, दारिद्र्य पायाद्वारे चालत घरात येते. शिवाय पायाला
लागलेल्या धुळीतूनही अशुभ शक्ती घरात प्रवेश करतात.
अशी कथा सांगतात की, फार पूर्वीच्या काळी एक राजा अतिशय घमेंडखोर होता. तो कोणाचेही कांही चालवून घेत नसे. एकदा काय झाले, तो राजा प्रजेच्या
दौर्यावर गेला असतां त्यावे पादत्राण तुटले आणि तो पाय धुवून येत असतांना पायाच्या घोट्याजवळ कांही भागाला पाणी लागले नाही, तर तेवढ्या
भागातून शनी त्याच्या राजवाड्य़ात प्रवेश करतां झाला आणि त्याचे सर्व साम्राज्य धुळीस मिळाले.
म्हणून घरात येण्यापूर्वी पाय सर्व बाजूंनी धुवून घरात यावे.