मराठीत साधारण १५ लाखांहून अधिक कविता जुन्या संतांनी रचलेल्या आहेत, एवढ्या अन्य कोणत्याही भाषेत नसती. संत मुकुंदराजांपासून ही मालिका सुरू जाहली आहे.
खालील उदाहरणे पहा - संतकवी आणि त्यांच्या कविता ( अभंग, श्लोक वगैरे रचना असू शकतील )
ज्ञानदेव - १००००
बहिरा जातदेव - ७५०००
विष्णुदास नामा - ३००००
एकनाथ - ६००००
शिवकल्याण - ८५०००
दासोपंत - १३५०००
कृष्णदास मुद्गल - १००००
माधव तंजावरकर - ६००००
कृष्णयाज्ञवल्की - ४०००
मुक्तेश्वर - २००००
वामन - २७०००
श्रीधर - ३००००
शिवदास गोमा - १००००
सदानंद - २००००
सोहिरोबा - २००००
हरिबोवा भॊडवे - ७५०००
चिदंबरदास राजाराम - १५००००
रत्नाकर - २५०००
रामी रामदास - १००००
गिरिधर - २००००
नारायण महाराज जालवणकर - २००००
रंगनाथ मोगरेकर - २००००
जयराम - १००००
कृष्णदयार्णव - ५२०००
रामदास - १००००
तुकाराम - ४५००
महिपती - ४००००
मोरोपंत - ७५०००
गोपाल - ४२०००
निरंजन रघुनाथ - ८०००
शुभानंद - १०००
रमावल्लभदास - १००००
विप्रनारायण - ६४२८
नरहरी मोरेश्वर - २००००
शहामुनी - १००००
विनायक महादेव नातू - ५६६५
अनंतसुत विट्ठल - १४२३६
परशुराम ढवळे - ३७८३
दिनकर रामदासी - ८०००
मेरूस्वामी - १२०००
आत्माराम रामदासी - २००००
एकंदर - १३५५६१२ होत.
ह्यांत मुकुंदराज, नामापाठक, विट्ठल, त्र्यंबक, आनंदतनय, अमृतराय, अनंत, शिवराम, उद्धव चिद्धन वगैरे शेकडो कवींच्या कविता धरलेल्या नाहीत.
हे खूपच जुने कवी झाले, आपली संतमंडळी धरलेली नाहीत. संतमंडळींची संख्या २५० च्या वर आहे, ज्यांनी पद, कविता आणि अभंग रचना केलेल्या आहेत.