TransLiteral
मुंज मुलाच्या आठव्या वर्षी केली जाते नाहीतर लग्नांत केली जाते.
यात बटूला ' योगदीक्षा ' देऊन गायत्री मंत्र शिकविला जातो. शिवाय सूर्योपासनेचा अधिकार दिला जातो. जानव्याला तीन दोरे असतात, ते सत्व, रज व तम या
तीन गुणांनी भारलेले असतात आणि त्याची गांठ म्हणजे ' ब्रह्मगांठ '.
अशुभ कर्म करतेवेळी जानवे काढून खुंटीला लटकवून ठेवावे, जमिनीवर ठेऊ नये. सुतक असल्यास सुतक फिटल्यावर ब्राह्मणाकडून जानवे बदलून घ्यावे.