TransLiteral
‘‘वैराग्य हे वृत्तीत असते. भगवंताने जे दिले त्यात समाधान असून इतर काही हवे असे न वाटणे म्हणजे वैराग्य होय.’’
देहाच्या ठिकाणी वासना उडवली जाते तिथेच वैराग्य नांदते.
वैराग्याच्या चार अवस्था -
१ - यतमान वैराग्य -
एकदा वैराग्याचा उदय झाला म्हणजे मुमुक्षूकडून विषयवासना जिंकण्यासाठी चढता प्रयत्न सतत केला जातो, त्यास यतमान वैराग्य म्हणतात.
२ - व्यतिरेक वैराग्य -
चित्तात वासना असणे हा त्यांचा चित्तातील अन्वय होय आणि त्या चित्तातून नाहिशा होणे हा त्यांचा व्यतिरेक होय. आत्मनिरीक्षणाने मुमुक्षूला त्यांचा अन्वय - व्यतिरेक स्पष्ट कळतो. त्यास व्यतिरेक वैराग्य म्हणतात.
३ - एकेंद्रिय वैराग्य -
इंद्रिये, मन, बुद्धे ही तिन्ही वासनांचे अधिष्ठान होत. इंद्रिये व मन स्वाधीन झालेली असली तरी बुद्धी या अधिष्ठानात वासना बीजरुपाने उरलेली असल्यामुळे तिची जागृती न होण्यासाठी साधने चालू ठेवण्याची आवश्यकता संपत नाही. या वैराग्याच्या अवस्थेला एकेंद्रिय वैराग्य म्हणतात.
४ - वशीकार वैराग्य -
या अस्वस्थेत वैराग्य हा योग्याचा सहजस्वभाव बनलेला असतो. वैराग्यासाठी साधनांची गरज उरत नाही. व्युत्थान दशेतही (समाधी उतरणे म्हणजे व्युत्थान) त्याच्या चित्तात वासना अंकुर उद्भवत नाही. या वैराग्यास वशीकार वैराग्य म्हणतात.