मरणाच्या इच्छेने खूप उपवास करून देह ठेवणे, शस्त्राने, विष पिऊन, पाण्यात बुडी घेऊन, टांगून घेऊन ( फाशी घेऊन ), पर्वतावरून किंवा उंचावरून उडी मारून इ. कारणाने मृत असता - आत्महत्या केली असता अशौच नाही म्हणजे सुतक नाही.
गुरुहत्या करणारा वगैरे अशाप्रकारच्या त्याज्य व्यक्तीचे दाहकर्म करू नये अथवा त्याचे शौचही पाळू नये.
नास्तिक, निच कर्म करणारे, पितृकर्म जे करत नाहीत अशाकडे जेवणसुद्धा करू नये तसेच पाणी सुद्धा पिऊ नये.
शास्त्राचा उद्देश सर्वांनी नियमात, चांगले वागावे असा असावा म्हणूनच असे कडक नियम केले असावेत.
आधार : निर्णयसिंधू, गरूड पुराण .....